रशिया-युक्रेन युद्ध; २१९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईला रवाना
बातमी विदेश

रशिया-युक्रेन युद्ध; २१९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईला रवाना

रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये १८ हजारांवर भारतीय ( indians evacuated from ukraine ) अडकले आहेत. आता या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने योजना आखली आहे. या योजनेनुसार एअर इंडियाचे विमान रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये दाखल झाले आहे. या विमानाने आज पहाटे मुंबईहून उड्डाण केले. होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एअर इंडियाचे Boeing 787 जातीचे AI-1943 क्रमांकच्या विमानाने आज पहाटे मुंबईहून ३ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण केले. हे विमान रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये सुरक्षितपणे उतरले. यानंतर भारतीय नागरिकांना घेऊन या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले आहे. या विमानात २१९ भारतीय आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली आहे.

युक्रेनमधून सुरक्षित बाहेर आलेल्या २१९ भारतीय यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईला रवाना झाले आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या टीम अथक प्रयत्न करत आहेत. आपण स्वतः सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे जयशंकर यांनी सांगितले.