सर्वोच्च न्यायालायने facebook आणि WhatsApp ला फटकारले; तुम्ही दोन- तीन ट्रिलीयन रुपयांची कंपनी असाल, पण…
देश बातमी

सर्वोच्च न्यायालायने facebook आणि WhatsApp ला फटकारले; तुम्ही दोन- तीन ट्रिलीयन रुपयांची कंपनी असाल, पण…

नवी दिल्ली : ”तुम्ही दोन किंवा तीन ट्रिलीयन रुपयांची कंपनी असाल. पण नागरिक आपल्या खासगी जीवनाचे मूल्य त्यापेक्षाही जास्त असल्याचं मानतात, आणि तसं मानण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे.” अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियाच्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन Facebook आणि WhatsApp ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. WhatsApp ने 2016 साली आपली प्रायव्हसी पॉलिसी तयार केली होती. त्यावेळीही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युरोप आणि भारत या दोन ठिकाणी Facebook आणि WhatsApp या सोशल मीडियाने प्रायव्हसी संबंधित वेगवेगळे धोरण अवलंबले आहे, अशा स्वरुपाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या दोन कंपन्यांना फटकारले आहे. तसेच Facebook आणि WhatsApp या कंपन्यांनी आपण लोकांचे मेसेज वाचत नाही असे लिखित स्वरुपात द्यावे असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

त्याचबरोबर भारतात डेटा प्रोटेक्शन संबंधी नवीन कायदा तयार करण्यात येत आहे. तो कायदा तयार करण्यापूर्वीच WhatsApp ने आपली नवी प्रायव्हसी तयार केली असंही या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलं होतं की, नागरिकांच्या खासगी जीवनाचं संरक्षण करण्यासाठी सरकार काही पाऊले उचलणार आहे का? सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रश्नावर केंद्र सरकारने अद्याप उत्तर दिलं नाही.