न्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात? थांबा, आधी हे वाचाच
कोरोना इम्पॅक्ट बातमी मुंबई

न्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात? थांबा, आधी हे वाचाच

मुंबई : देशात कोरोना महामारीचा प्रभाव अद्यापही पाहायला मिळत आहे. अशातच ब्रिटन आणि इतर देशांमध्ये कोरोणाचा नवा प्रकार समोर आल्याने भारतही सतर्क झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आता परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण अजूनही या व्हायरसचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या पार्श्वभूमीवर यंदा नव वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचे बेत आखणाऱ्या मुंबईकरांसाठी विशेष बातमी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यसरकारने मुंबईत पाच जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीसही यंदा विशेष सतर्क असणार आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ”नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. “नव वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच कोविड-१९ नियमांचे काटेकोटरपणे पालन होतेय की, नाही त्यावर तैनात पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल”

नांगरे पाटील पुढे म्हणाले की, ”बोटीवर तसेच गच्चीवर पार्ट्यांना परवानगी मिळणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांवर आणि गर्दीवर कारवाई करण्यात येईल. छेडछाडीच्या, त्रास देण्याच्या घटना रोखण्यासाठी विविध ठिकाणी विशेष पथक तैनात असेल. घातपाताचा धोका लक्षात घेऊनही मुंबई पोलीस सज्ज आहेत. बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच ड्रींक अँड ड्राइव्ह विरोधात वाहतूक पोलीस दरवर्षीप्रमाणे मोहिम राबवतील.

“नाइट कर्फ्यूच्या आदेशानुसार, नाइट कर्फ्यूच्या निर्बंधामुळे हॉटेल, पब रात्री ११ वाजता बंद करावे लागतील. जर असे केले नाही, तर परिणाम भोगावे लागतील. पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येणावर बंदी आहे. लोक त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर पडले आणि चार किंवा त्यापेक्षा कमी जण असतील, तर काही अडचण नाही”

नियमांचे पालन न करणाऱ्या मालकांवर तसेच कोणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. मात्र निर्बंध असले तरी, मुंबईकरांना गेट वे ऑफ इंडिया. मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ या ठिकाणी संध्याकाळपासून जाऊ शकतात. पण छोटया गटाने, चारपेक्षा कमी लोक असले पाहिजेत. पोलीस या ठिकाणी गर्दी जमू देणार नाहीत” असे नांगरे पाटील म्हणाले.