कोरोनामुळे एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू; एकाच वेळी पाच जणांचे अंत्यविधी
देश बातमी

कोरोनामुळे एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू; एकाच वेळी पाच जणांचे अंत्यविधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे सूपूर्ण कुटुंबे उद्धवस्त होत असल्याचे समोर येत आहे. अशात सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरीही करोनाचा धोका टळलेला नसताना एक दुःखद बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू उत्तर प्रदेशातल्या लखनौजवळच्या इमलिया गावात झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२५ एप्रिल ते १५ मे या २० दिवसांच्या कालावधीमध्ये ओमकार यादव यांच्या परिवारातल्या सात जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती तर एकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचाही मृत्यू झाला. या घटनेबद्दल इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासन कोणतीही पावलं उचलायला तयार नाहीत. गावचे प्रमुख मेवाराम यांनी सांगितलं की, एका गावात एवढे मृत्यू होत आहेत याबद्दल चौकशी व्हायला हवी. मात्र, गावात साधी स्वच्छतेची सुविधाही उपलब्ध करुन दिलेली नाही.

त्यांनी सरकारवर असेही आरोप केले आहेत की, मृत व्यक्तींना योग्य उपचार मिळाले नाहीत, त्यांना ऑक्सिजनयुक्त बेड्स मिळाले नाहीत. सरकारला दोष देताना ते म्हणतात, गावात ५९ कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि या सर्वांना स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागत आहे. त्यानुसार, एकाचवेली पाचजणांवर अंत्यविधी करावे लागले असल्याचे सांगण्यात आले आहे.