राज्यात थंडीची लाट ! सर्वात कमी तापमानाची नोंद ‘या’ जिल्ह्यात
बातमी महाराष्ट्र

राज्यात थंडीची लाट ! सर्वात कमी तापमानाची नोंद ‘या’ जिल्ह्यात

मुंबई : राज्यात एक प्रकारे थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदवण्यात आले आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणी जिल्ह्यात 5.6 अंश सेल्सिअस, गोंदियामध्ये 7.4 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी आहे. कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून शीतलहरी या महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.

उत्तर भारतात पुढील दोन दिवसांत थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्‍यता आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे.