मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास उद्धव ठाकरेंकडे नाही
राजकारण

मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास उद्धव ठाकरेंकडे नाही

मुंबई : ”मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास त्यांच्याकडे नाहीये. ना त्यांना खड्डे माहितीये, ना राज्याची तिजोरी माहितीये. उद्धव ठाकरेंचा त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश नाहीये. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला आहेत. शिवसेना कलेक्टरसारखे सगळीकडे कलेक्शनला फिरतायेत,’ असा खोचक टोला भाजपा खासदार नारायण यांनी लगावला आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”मुख्यमंत्र्यांना गाडी कशी चालवायची ही माहीती असेल, पण सरकार चालवण्याचा त्यांचा अभ्यास नाही. त्यामुळं सरकार पुढे जात नाहीये. आज पगार होत नाहीये याला कारण उद्धव ठाकरेच आहेत,’ असा घणाघाती आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

त्याचबरोबर, राज्य सरकार, कृषी विधेयक, ठाकरे सरकारमधील मतभेद याविषयांवर राणेंनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले की, ”शरद पवार आणि मुख्यमंत्री दोघंही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जाणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी मोदींनी कृषी विधेयक आणलं आहे. त्याला हे विरोध करतायेत हे राजकीय आंदोलन आहे, असं राणेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं कोणतही काम महाविकास आघाडीचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसेच नाहीत.

तसंच, यापूर्वी शरद पवार हेच विधेयकासाठी प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकायची परवानगी आहे. मग विरोध कशाला. धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?, असा सवालच नारायण राणे यांनी केला आहे.

आज सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. एसटीचे पगार दोन-तीन महिने होत नाहीयेत. आज सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. आधी त्यांनी ती सुधारावी नंतर त्यांनी रस्त्यावर यावं. निदान मातोश्रीच्या बाहेर मुख्यमंत्री पडतील आणि आमचा मुख्यमंत्री असा आहे हे लोकं बघतील तरी, असं टोला राणेंनी लगावला आहे.