अकोला : दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी दोन ट्विट करून शेलार यांना घेरलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत आशिष शेलारांनाच परखड सवाल केला आहे. ”दिल्ली हिंसाचाराला जबाबदार असलेले अभिनेते दीप सिद्धू हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. त्यावर शेलार का बोलले नाहीत? असा परखड सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच सिद्धू तुमचा कोण लागतो?, असा सवालही त्यांनी केला आहे.
आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही.@TV9Marathi@abpmajhatv
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 27, 2021
”आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत? याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही,” अशी घणाघाती टीकाही मिटकरी यांनी केली आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात अनेक पोलीस गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर महाराष्ट्रातील भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.