बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
राजकारण

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला आहे. ईडीच्या नोटीसीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात’, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली आहे. तसेच, शिवसेना भाजपला जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही राऊत यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय राऊत म्हणाले की, ”राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. भाजपचे 3 नेते हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहे’ असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सरकार पाडण्यासंबंधी भाजपा भाजपाचे काही नेते वारंवार धमकावत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. ‘भाजपचे 3 नेते हे सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र घेऊन येत आहे. त्यानुसारच ही नेते बोलत आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपचे काही नेते आणि हस्तक हे मला सातत्याने येऊन भेटत आहे. या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचे ठरवले आहे. या ना त्या मार्गाने इशारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेही मला धमकावण्यात आले आहे’ असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केलाय.

‘ईडी आणि केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रताप सरनाईक हे टोकण आहे. डिसेंबरपर्यंत भाजपची डेडलाईन होती. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी ईडीकडून प्रयत्न सुरू आहे. बायकांच्या पदराच्या आड खेळी खेळीत आहे’ असंही राऊत म्हणाले.