भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका
राजकारण

भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

रांची : ”बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. रांची येथील हरमू मैदानात आयोजित केलेल्या एका सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा करणार आहेत. दुसरीकडे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत.

“देशभरात प्रेम, बंधुभाव, वाढेल किंवा तसं वातावरण निर्माण करायची केंद्राची जबाबदारी असते. केंद्रात सत्ते असलेलं भाजप देशात जातीय विष पसरवत आहे. शेतकरी गेल्या 100 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर बसला आहे. आपल्या हक्कांसाठी तो लढतो आहे पण केंद्रातील सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. दिवसांपासून निषेध करीत आहेत, पंतप्रधानांना कोलकात्याला जाण्यासाठी वेळ आहे. तिथल्या पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला वेळ आहे पण इथे दिल्लीतल्या मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, ”राहुल द्रविडने ज्यावेळी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देशासमोर पुढचा कर्णधार कोण, असा यक्ष प्रश्न उभा ठाकला. त्यानंतर झारखंडचा एक मुलगा, महेंद्रसिंग धोनी त्याचं नाव… सचिन तेंडुलकरने त्याच्या नावाची शिफारस केली आणि पुढे भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय होण्यासाठी धोनीने कष्ट घेतले”, अशी स्तुती शरद पवार यांनी केली.

टीम इंडियाची जबाबदारी धोनीवर भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. भारताच्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान राहुल द्रविडने मला सांगितले की, कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे त्यांच्या खेळावर परिणाम होत आहे आणि त्याला राजीनामा द्यायचा आहे. या परिस्थितीत सचिन तेंडुलकर यांना कर्णधार होण्यासंदर्भात विचारणा केली. मात्र, त्यानेही नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले.

त्यानंतर मी सचिनला विचारलं की संघाचं नेतृत्व कोण करणार? त्यावेळी त्याने धोनीच्या नावाची शिफारस केली. तो म्हणाला “आपल्याकडे एक खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय करू शकतो आणि त्यानंतर धोनीला ही जबाबदारी देण्यात आली, ज्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटला जगभरात लोकप्रियता मिळाली. एक अढळ स्थान मिळालं, असं शरद पवार म्हणाले.”