भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर : आयारामांना पदे आणि सन्मान देण्याच्या धोरणातून कोल्हापूर भाजपामधला अंतर्गत वाद समोर आला आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी राजीनामा द्यावा; अशी मागणी त्यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्षात फोडाफोडी करून अनेकांना भाजपात घेतले. पण जुन्या जाणत्यांना डावलून नव्याने व इतर पक्षांतुन आलेल्यांनाच अनेक पदे दिली. दोघांनीही या निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. एकतर्फी विजय मिळेल असा त्यांना विश्वास होता. बाहेरून आलेल्या लोकांवर विश्वास ठेवला. असा आरोप शिवाजी बुवा यांनी केला आहे.

तर पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याने भाजपचा पराभव झाला. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी घेऊन पाटील व घाटगे यांनी राजीनामा द्यावा, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. “आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही. पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्ष सक्षम असला पाहिजे ही भूमिका बऱ्याच कार्यकर्त्यांची आहे,” असेही शिवाजी बुवा आणि पीड पाटील म्हणाले.

दरम्यान, खुद्द चंद्रकांत पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोथरूडमधून निवडणूक लढवली होती. त्यामुळं यावेळी संग्राम देशमुख यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या फरकानं त्यांचा पराभव केला. अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पराभव झाल्यानं आता पक्षनेतृत्वाविरोधात धुसफूस सुरू झाली आहे.