फडणवीसांचे राष्ट्रवादीला सडेतोड उत्तर; भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट…
राजकारण

फडणवीसांचे राष्ट्रवादीला सडेतोड उत्तर; भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट…

नाशिक : ”सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत आहेत. भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होतील. असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपातील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून लवकरच राष्टवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही म्हटले होते. याला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाशिक येथील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले.

याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ”येत्या काळात अनेक लोकांचे भाजपात प्रवेश होणार आहेत, काहीजण रोज वावड्या उठवतात की भाजपाचे लोक आमच्याकडं येणार आहेत. पण, कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्याच पक्षातील नाराज आमदारांना संकेत देण्यासाठी या पुंग्या वाजवत आहेत. तिन्ही पक्षात अनेक आमदार नाराज आहेत, त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा, म्हणून असं बोललं जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितंल.

”देशाचं भविष्य हे राहुल गांधी नाही, युपीए नाही. तर, या देशाचं वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे, एकादं धोक्यानं आलेलं सरकार किती काळ चालतं? कसं चालतं, यासंदर्भातील सगळी माहिती सगळ्यांना आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढावं ही तर माझीच इच्छा आहे, त्यांनी जरुर लढावं, असं आव्हानंही फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय.