म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी

पुणे : ‘२१व्या शतकात देशाला जात-वर्णांवर आधारीत नव्हे तर विवेकानंदाना अपेक्षीत विश्वबंधूत्वाचे नाते जपणारे, विज्ञानधिष्ठीत, व्यापक व सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण देण्यासाठी महाविकास आघाडीचेच ऊमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन  पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचार सांगता प्रसंगी  काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले आहे. आज (ता. २९) रविवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधान परीषदेत संविधानात्म राष्ट्रभावनेला समर्पित दुरदृष्टीच्या विचारींची धोरणे आखण्यार्या पक्षांच्या प्रतिनिधींची तेथे गरज आहे, त्या मुळे देशास १६ व्या शतकाकडे मागे नेणाऱ्या धोरणांचे समर्थन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ऊमेदवारांना रोखणे हीच देशाची गरज आहे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून देणे हे आज देश व समाजापोटी कर्तव्य ठरेल, असे आवाहनही गोपाळदादा तिवारी यांनी प्रचार समारोप समयी केले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदीर भूमिपूजन प्रसंगी केलेल्या भाषणातून जे सूर उमटतात तेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात दिसून येतात. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील शैक्षणीक प्रगती व साक्षरता लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही किंचीत अधिकच असल्यामुळे, देशातील कोट्यावधी विद्वतेचा प्राप्त तरूण परदेशात जाऊन विविध आघाड्यांवर प्रगतीपथावर आहेत व हे आजपर्यंत देशांतर्गत राबवलेल्या शैक्षणिक धोरणे, शिक्षणाच्या संधी व ऊपलब्धते मुळेच शक्य झाले आहे मात्र त्या धोरणास छेद देऊन देशास १६व्या शतकाकडे नेणारे जाती-धर्म व वर्ण आधारीत व आहेरे वर्गाचे हित जपणारे शैक्षणिक धोरण भाजप देशांतर्गत लागू करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप गोपाळदादा तिवारी यांनी या पत्रकात केला आहे.