काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, भाजपने देशात हत्याकांड घडवलंय
राजकारण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, भाजपने देशात हत्याकांड घडवलंय

मुंबई : कोरोनाच्या काळात भाजपने देशात हत्याकांड घडवण्याचं काम केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. ऑक्सिजन पुरवठ्यावरही केंद्राचं लक्ष नव्हत त्यामुळे कोरोना काळात मृत्यूचं पाप भाजपाने केल्याचा घणाघात नाना पटोलेंनी केला. जेव्हा कोरोना आपल्या देशात येत होता तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सूचना करुनही आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये व्यग्र असल्याचे आपण पाहिले, असेही ते म्हणाले.

लस आपल्याकडे उपलब्ध असताना ती पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं काम केलं आणि म्हणून या व्यवस्थेसाठी हेच जबाबदार आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन इत्यादीचा कसा पुरवठा केला तेही आपण पाहिले. भाजपाने करोनाच्या काळात देशामध्ये एकप्रकारे हत्याकांड घडवण्याचं पाप केलं, असं आमचं म्हणणं आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.