आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
राजकारण

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकत्रित सरकार असले तरी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेस सातत्याने आगामी विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढविण्याचा निर्धार करत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षसंघटनेला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना ‘आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असा निर्धार पटोले यांनी बोलून दाखवला.

‘मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर कामगार कायदे मोडीत काढले आहे. सर्व कायदे आता मालकाच्या बाजूने गेले असून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. पण, राज्यात कामगार विरोधी कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.