रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी
राजकारण

रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी

सांगली : ”अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे,” असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरुवातीला दिलेला आंदोलनाचा इशारा दिला. मात्र भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतले. अण्णांच्या या भूमिकेवर रघुनाथ पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अण्णांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना रघुनाथ पाटील म्हणाले की, ”एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळवलं की त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काही अर्थ नाही. अण्णा हजारेंच वय लक्षात घेता त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे. काही वर्षांपूर्वी दिल्लीत रामलीला मैदानावर मोठं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाला काही प्रमाणात यश देखील मिळाले.पण आता अण्णा हजारेंच वय झाले आहे, असे म्हणत एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळवलं की, त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काही अर्थ नाही असा दाखला देत अण्णांनी आता निवृत्ती घ्यावी असा सल्ला रघुनाथ पाटील यांनी दिलाय.

तर सोमवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावरही रघुनाथ पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ”केद्राचं बजेट शेतकऱ्यांच्यासाठी निराशाजनक बजेट असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. आजच्या बजेटवर शेतकरी आंदोलनाची छाप दिसून येत आहे,तसेच आंदोलनाचा दबाव होता, असं मतही रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. धान खरेदीसाठी, सिंचन योजनेसठी नगण्य तरतूद असून शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत करण्यात आली आहे,ती शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी अशी टीका केली आहे. केंद्र सरकारने नोटा छापण्याऐवजी आर्थिक परिस्थिती सुधारावी, सा टोलाही रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे.