सरकार पडण्यासाठी भाजपाच्या तीन नेत्यांकडून ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर : संजय राऊत
राजकारण

सरकार पडण्यासाठी भाजपाच्या तीन नेत्यांकडून ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर : संजय राऊत

मुंबई : ”राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. भाजपचे 3 नेते हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहे’ असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. हे वैफल्यग्रस्त झाले आहे. राजकारणामध्ये समोरासमोर येऊन लढण्याची इच्छा असायला हवी. घरातील मुलांवर, महिलांवर अशी कारवाई करत असाल तर याला नामर्दपणा म्हणतात. असा नामर्दपणा जण कुणी करत असेल तर शिवसेना त्याच शब्दांत आणि त्याच थरारला जाऊन उत्तर दिले जाईल, जर लढायचे असेल तर समोरासमोर येऊन लढावे’ असं आव्हान राऊत यांनी दिले.

‘माझ्या पत्नीच्या खात्यावर 10 वर्षांपूर्वीचे हे व्यवहार आहे. मुंबईत घर घेण्यासाठी 50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे. भाजप सरकार सत्तेवर येत नाही म्हणून ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे’ असा खुलासाही राऊत यांनी केला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘गेल्या दीड महिन्यांपासून आमच्याकडे ईडी पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही कागदपत्र हवी आहे, ती वेळोवेळी पुरवली आहे. भाजपा नेते जे पीएमसी घोटाळा, HDIL प्रकरणाचा उल्लेख करत आहे त्यातील अशा कोणत्याही पत्रात याबाबत उल्लेखही नाही. भाजपचे नेते माकडाप्रमाणे उड्या मारत आहेत. ईडी आणि भाजप नेत्यांची हातमिळवणी झाली आहे’, असा आरोपही राऊत यांनी केला.

‘ईडी हा काही महत्त्वाचा विषय नाही. कधी काळी या संस्थांना प्रतिष्ठा प्राप्त होत्या. सीबीआय, आयकर विभागाने काही कारवाई केली तर त्यात गांभीर्य होते. पण, गेल्या वर्षात ईडीने नोटीस बजावणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने भडास काढणे हे गृहीत धरले आहे. आतापर्यंत एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आल्या आहे. शरद पवार यांना सुद्धा ईडीने नोटीस बजावल्या आहे’ असंही राऊत म्हणाले.

‘फडणवीस म्हणाले की, काही केले नसेल तर ईडीची नोटीस येणार नाही. नोटीस हे काही ब्रम्ह वाक्य आहे का? आमच्यापैकी कुणीही काही केले नाही. आता तुम्हाला घाबरावे लागणार आहे’ असा इशाराही राऊत यांनी दिला.