अशिक्षित लोक हे देशावरचं ओझं, ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत – अमित शाह
राजकारण

अशिक्षित लोक हे देशावरचं ओझं, ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत – अमित शाह

नवी दिल्ली : रविवारी झालेल्या एका मुलाखतीत अमित शाह यांनी अशिक्षित लोकांना देशावरचं ओझं अस संबोधलं असून ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद टीव्हीतर्फे मुलाखत घेण्यात आली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रविवारी झालेल्या या मुलाखतीत अमित शाह यांनीपंतप्रधान मोदींच्या आज पर्यंतच्या कारकिर्दीची भरभरून स्तुती केली आहे. पण त्यासोबत एक त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यासोबतच अशिक्षित लोकांना देशावरचं ओझं अस संबोधलं असून ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत, असं विधानही केलं आहे. या मुलाखतीत बोलताना शाह म्हणाले, एक अशिक्षित व्यक्ती देशावरचं मोठं ओझं असतं. कारण त्याला ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची. त्यामुळे अशिक्षित व्यक्ती एक चांगली नागरिक कशी होईल?

ते पुढे बोलताना म्हणाले, जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मुलं शाळेत न जाण्याचं प्रमाण जास्त होतं. मोदी यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे मुलांना शाळेत टाकण्याची मोहीम राबवली. त्यांनी पालकांची एक समिती तयार केली. शिक्षकांच्या जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. याचा परिणाम असा झाला की, शाळेबाहेर असलेल्या मुलांचे प्रमाण ३७ टक्क्यांवरुन एक टक्क्याच्याही खाली आले.

या मुलाखतीदरम्यान शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीवर विश्वास असणारा नेता असे संबोधले आहे. ते म्हणाले की, टीकाकारही ही गोष्ट मान्य करतील की केंद्रीय मंत्रिमंडळ कधीही अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने कार्यरत नव्हतं, जसं हे मंत्रिमंडळ काम करत आहे.