संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द; कारण…
राजकारण

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द; कारण…

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. कोविड 19चा प्रसार टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हे अधिवेशन न घेण्याबाबत मत मांडलं होतं. आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशात देखील कोरोनाचा प्रकोप पुन्हा हळूहळू वाढत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जोशी यांनी सांगितलं की, कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या वादग्रस्त नवीन शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन घ्यावं अशा मागणीचं पत्र दिलं होतं. मात्र कोरोनामुळं अधिवेशन होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि कोविडमुळे अधिवेशन घेण्याबाबत सर्वाचं एकमत आहे.

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. सध्या देशभरात 3.35 लाखांहून अधिक अॅक्टिव कोरोना केसेस आहेत. तर देशात 99 लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. देशात आतापर्यंत 1.43 लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

तर गेल्या २४ तासात देशात २७,०७१ नवे रुग्ण सापडले आहेत. र मागील २४ तासात देशात ३३६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात ३ लाख ५२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ४३ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ९८ लाखांच्या पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ९८,८४,१०० रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १,४३,३५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबतही भूमिका स्पष्ट केली. केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, शेतकऱ्यांना चर्चेचा पर्याय अजूनही खुला आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, शेतकरी जर काही प्रस्ताव देत असतील तर आम्ही तयार आहोत. मात्र शेतकरी कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवर अडून आहेत. शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या वादग्रस्त नवीन शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन घ्यावं अशा मागणीचं पत्र दिलं होतं. या पत्राला उत्तर देताना कोरोनामुळं अधिवेशन होणार नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज शेतकरी नेत्यांच्या एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. अजूनही शेतकरी आणि सरकारमध्ये कृषी कायद्यातील मुद्द्यांवरुन मतभेद सुरुच आहेत. आज 20 व्या दिवशी शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. आजच्या बैठकीनंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शेतकरी नेते आंदोलनासोबत सरकारला चर्चा करण्यासाठी देखील आवाहन करत आहेत.