Ind Vs Eng: पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह
क्रीडा

Ind Vs Eng: पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने २-१ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने झाले आहेत. पाचवा सामना जिंकून बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असणार आहे. तर भारताला पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. असं असताना आता पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय संघाचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पाचव्या कसोटीवर टांगती तलवार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, भारत अरूण आणि आर. श्रीधर यांना करोनाची लागण झाली आहे. या तिघांना लंडनमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे. चौथ्या कसोटी सामन्यावेळी भारतीय संघातील खेळाडू सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आले होते. त्यामुळे करोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चौथ्या कसोटीवेळी बहुतेक खेळाडू सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आले होते. गेल्या आठवड्यात सपोर्ट स्टाफची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती.

१९ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार असल्याने बीसीसीआयची चिंता वाढली आहे. जर खेळाडूंना करोनाची लागण झाली तर आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान पाचवा कसोटी सामन्यापूर्वीचा संघ सराव रद्द करण्यात आला आहे. खेळाडूंनाा रुममधून बाहेर पडू नका, असे आदेश देण्यात आले आहेत.