भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज
क्रीडा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध भारताची पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडमध्ये पावसाचं लहरी वातावरण आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दुसरीकडे पावसाचं गणित रोज बदलत असतं त्यामुळे कदाचित पाऊस पडणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

असे असेल वेळापत्रक
पहिला कसोटी सामना ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट ( ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम)
दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट ( लॉर्ड मैदान, लंडन)
तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट (लीड्स)
चौथा कसोटी सामना २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर (ओव्हल मैदान, लंडन)
पाचवा कसोटी सामना १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर (ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅचेस्टर)

भारतीय संघ- रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन