बाबो…हे कसं झालं! पुणेकर ऋतुराजनं ६ चेंडूत लगावले ७ सिक्स; Video पाहा काय घडलं
क्रीडा

बाबो…हे कसं झालं! पुणेकर ऋतुराजनं ६ चेंडूत लगावले ७ सिक्स; Video पाहा काय घडलं

मुंबई: ऋतुराज गायकवाड सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या शानदार फॉर्मने इतिहास घडवला आहे. ५० षटकांच्या विजय हजारे स्पर्धेत उत्तरप्रदेश विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळताना त्याने शानदार दुहेरी शतक लगावले. महाराष्ट्र संघाचा हा कर्णधार असा एक विक्रम करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. उत्तरप्रदेश विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने शानदार खेळी खेळली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अहमदाबाद येथील देशांतर्गत ५० षटकांच्या विजय हजारे करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने शिवा सिंगला एका षटकात सलग सात षटकार ठोकले. शिवा सिंगने टाकलेल्या डावाच्या ४९व्या षटकात गायकवाडने सात षटकार मारत आपला भन्नाट फॉर्म दाखवला. गायकवाडने पहिल्या चार चेंडूत चार षटकार ठोकले. षटकातील पाचवा चेंडू नो-बॉल होता ज्यावर गायकवाडने षटकार मारला. यानंतर मिळालेल्या फ्री हिटवर त्याने सहावा षटकार मारला. षटकातील शेवटचा चेंडूही गायकवाडने षटकार मारून सीमापार नेला. शिवाने त्याच्या षटकात ४३ धावा दिल्या. यादीतील कोणत्याही फलंदाजाने एका षटकात दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

त्याच्या या खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ५० षटकांत ५ बाद ३३० धावा केल्या. गायकवाडने १५९ चेंडूत १६ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने २२० धावांची खेळी केली. याआधी श्रीलंकेचा क्रिकेटपटू नविंदू पहासरानेही एका षटकात सात षटकार ठोकले, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना या तरुणाने एका षटकात सलग सात षटकार मारून इतिहास रचला, त्यात नो-बॉलचाही समावेश होता.

 

लिस्ट ए मध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम हर्शेल गिब्स आणि थिसारा परेराच्या नावावर आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गायकवाड हा ११ वा खेळाडू ठरला आहे. भारतासाठी या फॉरमॅटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याच्या बाबतीत गायकवाड पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या यादीत वीरेंद्र सेहवाग (२१९) आणि सचिन तेंडुलकर (नाबाद २००) या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. या यादीत नारायण जगदीसन, रोहित शर्मा, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ त्याच्या पुढे आहेत.

या सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, त्यानंतर गायकवाडच्या द्विशतकाच्या जोरावर संघाने ५ गडी गमावून ३३० धावांचा डोंगर उभारला.