भारत-श्रीलंका सामन्यांच्या बदलल्या वेळा; पाहा नवीन वेळापत्रक
क्रीडा

भारत-श्रीलंका सामन्यांच्या बदलल्या वेळा; पाहा नवीन वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत-श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या नवीन वेळा जाहीर केल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले, की भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यातील वनडे आणि टी-२० मालिका श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या शिबिरात कोरोनाच्या उद्रेकानंतर स्थगित करण्यात आली आहे. मात्र, ही मालिका रद्द केली गेली नव्हती. ही मालिका आता १८ तारखेपासून खेळली जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती. यापूर्वी वनडे मालिकेतील सामने दुपारी अडीच वाजता सुरू होणार होते. परंतु वेळापत्रकात बदल झाल्यानंतर हे सामने तीन वाजता सुरू होणार आहेत. टी-२० मालिकेतील सामने सात ऐवजी आठ वाजता खेळले जाणार आहेत.

वनडे मालिका
१) पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै

टी-२० मालिका
१) पहिला टी – २० सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै