कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे
क्रीडा

कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; मिळणार एवढे पैसे

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी क्रिकेटच्या अजिंक्यपदासाठीच्या फायनलची जोरदार चर्चा आहे. पण, या फायनलबाबत आता अजून एक गोष्ट समोर आली आहे. ही फायनल जो संघ जिंकेल त्यांच्यावर पैशांचा वर्षाव होणार आहे. विजेतेपदाची ही रक्कम कोट्यावधी रुपयांमध्ये असणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयसीसीची ही सर्वात महत्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आयसीसीने जबरदस्त पैशांचा वर्षाव करण्याचे ठरवले आहे. ही फायनल जो संघ जिंकेल त्याला जवळपास १२ कोटी रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर जो संघ या फायनलमध्ये पराभूत होईल त्यांना ६ कोटी रुपये मिळतील.

परंतु जर हा सामना अनिर्णीत राहीला किंवा निकाल लागू शकला नाही तर दोन्ही संघांना समान ९ कोटी रुपये मिळतील. त्यामुळे आतापर्यंत एक सामना जिंकल्यावर १२ कोटी रुपये मिळणे, ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे आता भारतीय संघ फायनल जिंकून १२ कोटी रुपये कमावणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.