आयपीएलसमोर विश्वचषकाची प्राइज मनी म्हणजे पानी कम, किती कोटींचा मोठा फरक आहे पाहा…
क्रीडा

आयपीएलसमोर विश्वचषकाची प्राइज मनी म्हणजे पानी कम, किती कोटींचा मोठा फरक आहे पाहा…

नवी दिल्ली : काही दिवसांमध्येच टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आता विश्वचषक जिंकणाऱ्या देशाला किती प्राइज मनी मिळणार, हे जाहीर करण्यात आले आहे. पण विश्वचषकाच्या विजेत्याला जी रक्कम मिळणार आहे ती आयपीएलच्या तुलनेत फारच कमी असल्याचे आता समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विश्वचषक ही जगभरातील सर्वात मोठी स्पर्धा आहे, तर आयपीएल ही एक बीसीसीआयची स्थानिक लीग आहे. पण या तरीही विश्वचषकापेक्षा आयपीएलमधील विजेत्याला जास्त रक्कम मिळते. पण या रक्कमेमध्ये तफावत ही भरपूरच जास्त असल्याचे आता समोर आले आहे. विश्वचषकाच्या दीडपट रक्कम ही आयपीएलच्या विजेत्याला दिले जाते, हे आता समोर आले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने विजेतेपद पटकानले होते. यावर्षी आयपीएलमध्ये दोन संघ नव्याने दाखल झाले होते. त्यामध्ये एक गुजरातचा संघही होता. गुजरातने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे जेतेपद पटकावले आणि त्यांना २० कोटी एवढी बक्षिसाची रक्कम देण्यात आली होती. त्यामुळे आयपीएलपेक्षा विश्वचषकामधील विजेत्या संघाला मोठी रक्कम मिळेल, असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे आता दिसत नाही.

यावर्षी जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांना जवळपास १२ कोटी रुपये एवढी बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. विश्वचषकातील उपविजेत्यांना यावेळी जवळपास ६ कोटी एवढी बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. पण विश्वचषकातील विजेत्या आणि उपविजेत्या संघाची रक्कम एकत्र केली तरी आयपीएलच्या विजेत्या एवढी रक्कम होत नाही. कारण विश्वचषकातील विजेत्याला १२ कोटी आणि उपविजेत्या ६ कोटी एवढी रक्कम मिळणार आहे. ही रक्कम एकत्रित करून १८ कोटी एवढी होते. पण त्यापेक्षा जास्त रक्कम ही फक्त आयपीएलच्या विजेत्याला मिळाली होती. त्यामुळे आता आयपीएल आणि विश्वचषक यांच्यातील कोणती मोठी स्पर्धा आहे, याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.

बीसीसीआय ही क्रिकेट विश्वात सर्वात धनाढ्य संघटना आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण आयसीसीपेक्षाही बीसीसीआयकडे जास्त पैसे असतील, असे कोणालाच वाटत नव्हते. पण आता दोन्ही स्पर्धांची प्राइज मनी पाहिली तर आयीसीसपेक्षा बीसीसीआय सरस असल्याचे दिसत आहे. त्यामुळे खेळाडूंनी पहिली पसंती देशाला द्यायची की आयपीएलसारख्या लीगला, याची चर्चा सुरु झाली आहे. भारताचे खेळाडू हे आयपीएल खेळायला जास्त पसंती देतात, असे यापूर्वी म्हटले गेले आहे. त्यामुळे आता यापुढे आयपीएल खेळायची की विश्वचषक, अशी द्विधा खेळाडूंच्या मनात येऊ शकते.