अभिमानास्पद! भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक; नेमबाज अवनी लेखराची कमाल
क्रीडा

अभिमानास्पद! भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक; नेमबाज अवनी लेखराची कमाल

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या आणखी एका खेळाडूने पदक मिळवून दिले आहे. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत भारतियांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले. अवनीला अंतिम फेरीमध्ये चीनची नेमबाजाने कडवी लढत दिली होती. पण नंतर अवनीने अचूक लक्ष साधत तिचा पराभव केला. चीनची महिला नेमबाज झांगने २४८.९ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आणि रौप्य पदक पटकावले.

दरम्यान, टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवस भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला. यामध्ये दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. पण तिने ऐतिहासिक रौप्यपदकावर मोहोर उमटवली. उंच उडीपटू निशाद कुमारने २.०६ मीटर अंतरावर झेप घेत रौप्यपदक कमावले. तर थाळीफेकपटू विनोद कुमारने कांस्यपदक जिंकले.