मोठे वक्तव्य : विराट कोहलीशिवाय आम्ही जिंकू शकतो, विधानाने खळबळ
क्रीडा

मोठे वक्तव्य : विराट कोहलीशिवाय आम्ही जिंकू शकतो, विधानाने खळबळ

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. या बदलावरून सोशल मीडियावर विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली असा वाद चाहत्यांमध्ये सुरू असताना बीसीसीआयच्या अध्यक्षांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, काही वर्षापूर्वी झालेल्या आशिया कप (२०१८) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला होता. त्या संघात विराट कोहली नव्हता. कोहली शिवाय संघ जिंकला होता. यावरून स्पष्ट होते की रोहितच्या नेतृत्वाखाली आमचा संघ किती मजबूत आहे.

रोहित शर्मा एक शानदार कर्णधार आहे. म्हणून तर निवड समितीने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. तो संघाला पुढे घेऊन जाईल. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. रोहितने मोठ्या स्पर्धेत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्याकडे सर्वोत्तम संघ आहे आणि आशा आहे की तो टीम इंडियाला मोठे यश मिळवून देईल, असे गांगुली म्हणाला.

काही दिवसांपूर्वी जेव्हा बीसीसीआयने वनडेचा कर्णधार म्हणून रोहितच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हा देखील गांगुलीने स्पष्ट केले होते की, ही निवड बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून केली आहे. बीसीसीआयने विराटला टी-२०चे कर्णधारपद सोडू नये असा सल्ला दिला होता. पण त्याने तो ऐकला नाही. निवड समितीच्या मते मर्यादीत षटकांच्या संघासाठी दोन वेगवेगळे कर्णधार असू शकत नाहीत.

विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआय आणि सौरव गांगुली यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले होते. बोर्डाने विराटला राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. पण विराटकडून काहीच उत्तर न मिळाल्याने अखेर बीसीसीआयने निर्णय जाहिर केला.