अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे
राजकारण

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे

अहमदनगर : ”कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात मांडण्याच आलेल्या मुद्द्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन असा इशाराच अण्णांनी दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं […]

विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं; शिवसेनेच्या संपादकीयवर भाजपा नेत्याचा घणाघात
राजकारण

विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं; शिवसेनेच्या संपादकीयवर भाजपा नेत्याचा घणाघात

मुंबई : ”ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात खेळलं गेलं ते खूप वाईट होतं. विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं. भाजपासोबत युती करून आमच्या मदतीने शिवसेना निवडून आली. असा घणाघात भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास […]

नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही: शिवसेना
राजकारण

नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही: शिवसेना

मुंबई : ”राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो. तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही.” असे म्हणत शिवसेनेने भाजपा नेत्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. अनेक ठिकाणी सत्तांतर झालं, तर काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. […]

सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा
राजकारण

सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई : “स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा ‘उखाड दिया’ची भाषा आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?,” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यावरून राजकारण रंगलं […]

चंद्रकांत पाटलांच्या पत्राला शिवसेनेकडून ‘अग्रलेखा’तूनच खरमरीत प्रत्युत्तर
राजकारण

चंद्रकांत पाटलांच्या पत्राला शिवसेनेकडून ‘अग्रलेखा’तूनच खरमरीत प्रत्युत्तर

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दैनिक सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना सामनातील भाषेविषयी पत्र लिहिले. यात दैनिक सामनाच्या अग्रलेखात राज्यातील आणि केंद्रातील भाजपा नेत्यांविषयी खालच्या स्तराची भाषा वापरली जाते, अशी तक्रार त्यांनी केली. यानंतर चंद्रकांत पाटलांच्या या पत्राला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातूनच उत्तर दिले आहे. ”चंद्रकांतदादांचे पत्रलेखन […]

सामनातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता; चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र
राजकारण

सामनातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता; चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना’तील अग्रलेखातील भाषेवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अग्रलेखातील भाषेबद्दल रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या पत्रात कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान, गेल्या […]

या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे : चंद्रकांत पाटील
इतर राजकारण

या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे : चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनच्या मुखपत्र असलेल्या सामना’ च्या अग्रलेखातून अलीकडे सतत भाजपा आणि भाजपा नेत्यांवर टीका केली जाते. अलीकडे सामनाच्या अग्रलेखात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका-टिप्पणी केली गेल्यामुळं ते नाराज झाले आहेत. यामुळे पाटील लवकरच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहोत. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली […]

ईडी’च्या एका नोटीसने शिवसेना हादरली; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

ईडी’च्या एका नोटीसने शिवसेना हादरली; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : ‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला”, अशा शब्दात भाजपा नेते राम कदम यांनी शिवसेना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसत असताना ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर जोरदार टीका केली. भाजपाचे आशिष […]

कॉंग्रेसकडून मोठी झेप घेण्याची अपेक्षा ठेवली तर, काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा?
राजकारण

कॉंग्रेसकडून मोठी झेप घेण्याची अपेक्षा ठेवली तर, काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीए अध्यक्षपदाची सुत्रं द्यावी, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. मात्र आता कॉंग्रेसच्या (युपीए) अध्यक्षपदावरून राज्यात शिवसेना-काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या या विधानावर काँग्रेसकडूनही उत्तर देण्यात आलं. काँग्रेसनं दिलेल्या उत्तरावरून आता शिवसेनेनं काँग्रेस नेत्यांनाच सवाल केला आहे. काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की […]

त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?; भाजपा
राजकारण

त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?; भाजपा

मुंबई : “दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले ८ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय. त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?”, अशा शब्दात भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली […]