नांदेड : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व टपरीधारकांसारख्या लहान व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. शुक्रवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीकडे त्यांनी विधानसभेत बोलताना सरकारचे लक्ष वेधले. याप्रसंगी ते म्हणाले की, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली. नांदेड […]