नागपूर : नागपुरात दोन गटात मोठा राडा झाला आहे. यानंतर नागपुरातील महाल परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दोन गट समोरासमोर आल्यानंतर दगडफेक करण्यात आली. औरंगजेबाच्या कबरीवरुन झालेला वाद जाळपोळीपर्यंत पोहोचला असून यात दगडफेक, तसंच वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले आहेत. तसंच पोलिसांच्या वाहनांचं, इतरही काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. […]
विदर्भ
अमरावतीत दहावीच्या गणिताच्या पेपरफुटीचा प्रकार; झेरॉक्स दुकानावर पोलिसांची कारवाई
अमरावती: राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू असताना पेपरफुटीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. जालना आणि यवतमाळनंतर आता अमरावती जिल्ह्यातही गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. चांदूरबाजार येथे पोलिसांनी झेरॉक्स दुकानावर धाड टाकून गणिताच्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स काढण्याचा प्रकार उघड केला आहे. ही घटना जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील झेरॉक्स सेंटरमध्ये घडली. पोलिस पथक गस्त घालत असताना काही विद्यार्थी गणिताच्या […]
देश आणि समाजाच्या विकासात युवकांचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
नागपूर, दि. ०४: ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. सेमिनरी हिल्स येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या रजत जयंती सभागृहात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या बाराव्या पदवीदान […]
शरद पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सौरभने आपण भाजप कार्यकर्ते असल्याचा उल्लेख ट्विटरवरील बायोमध्ये केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खासदार शरद पवार यांच्याविरोधात […]
राज्यात भूकंप? मंत्री राहिल की नाही माहिती नाही… कृषिमंत्री सत्तारांना कशाची कुणकुण लागलीये?
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सध्याचं शिंदे फडणनीस सरकार कोसळणार, असे आरोप दररोज विरोधी पक्ष करतो आहे. तशी शक्यता अनेक नेते बोलून दाखवत आहेत. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. अशा सगळ्या चर्चा सुरु असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या आणि सरकारच्या भवितव्याबाबत मोठे विधान केले आहे. मी किती दिवस कृषिमंत्री […]
राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण; नागपूर बसस्थानकापासून उपक्रमास प्रारंभ होणार
नागपूर दि. १५ : महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास फाटकमुक्त होईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील व त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. विदर्भातील रेल्वे उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि […]
बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेच्या अर्धा तास आधी व्हाट्सअँप वर फुटला
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, बुलडाणा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज, परीक्षेपूर्वी गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. कडेकोट बंदोबस्तातही पेपर कसा फुटला झाला. याबाबत चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज बारावीचा गणित परीक्षेचा पेपर आहे. सिंदखेडराजा येथील एका परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर फुटला आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर हा पेपर […]
शेतमजूर कुटुंबातील मुलाला सामाजिक न्याय विभागाची मिळाली फेलोशिप; ‘या’ देशात शिक्षण घेणार
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलाला शेतात मोल मजुरी करुन चांगलं शिक्षण दिलं. त्या मुलाने सुद्धा जिद्दीने चांगलं शिक्षण घेतलं. समाधान कांबळे असं तरुणाचं नाव असून त्याने फेलोशिप मिळवली असल्यामुळे तो पुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया या देशात रवाना झाला आहे. समाधान कांबळे याच्या आई-वडिलांनी शेतात मजुरी करुन शिकवणी दिली. आई-वडीलांच्या मोल मजुरीचं चीज […]
बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरली, ४८ हजार वर्षांपूर्वीचा Zombie व्हायरस पुन्हा जिवंत
मॉस्को: रशियातील शास्त्रज्ञांनी ४८५०० वर्षांपूर्वीच झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत केल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. रशियातील एका गोठलेल्या तलावात हा व्हायरस गाडण्यात आला होता. हा भयानक व्हायरस रशियातील तलावात हजारो वर्षांपूर्वी दबला गेला होता. हा संपूर्ण परिसर बर्फाच्छादित असल्यामुळे या व्हायरसपासून कोणताही धोका नव्हता. मात्र, अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे या परिसरातील बर्फ वितळू लागल्याने हा […]
बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
मुंबई दि.२८- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश […]