शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने फडणवीसांची राज्य सरकारवर जहरी टीका
राजकारण

शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने फडणवीसांची राज्य सरकारवर जहरी टीका

नागपूर : ”राज्यात राजकीय पक्षाचे मोठमोठे कार्यक्रम होतात त्यावर सरकार बंदी आणत नाही मात्र राज्य सरकारकडून शिवजयंती साजरी करतांना कलम १४४ लावले जाते. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत शिवजयंती साजरी होत राहील,”अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]