राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात पुन्हा वाढ; तर १०४ मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात पुन्हा वाढ; तर १०४ मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका मात्र टळलेला नाही. अद्यापही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार १९६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ६८८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, १०४ कोरोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ७२ हजार ८०० कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४ लाख ६४ हजार ८७६ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १लाख ३७ हजार ३१३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३९ लाख ७६ हजार ८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६४ हजार ८७६ (११.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७०१ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर २ हजार १२१ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१ हजार २३८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.