दिलासादायक! चार दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! चार दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात २७ हजार १७६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील ४ दिवसांपासून देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३० हजारांच्या खाली आल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, मागील २४ तासांत कोरोनामुळे २८४ जण मृत्युमुखी पडल्याने कोरोना मृत्यूंचा एकूण आकडा ४ लाख ४३ हजार ४९७ इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ पर्यंत वाढली असून ती एकूण करोनाबाधितांच्या १.०५ टक्के आहे. तर, एकूण ३ कोटी २५ लाख २२ हजार १७१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.६२ टक्के इतके आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ७५ कोटी ८९ लाख १२ हजार २७७ मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात लस टोचून घेतलेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख १५ हजार ६९० वर पोहोचली आहे.

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे. कोरोनाची देशव्यापी तिसरी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. जरी आलीच तरीही ती दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूपच कमी तीव्रतेची असेल, असे त्यांनी म्हटले आहे.