राज्यात पुन्हा उच्चांक; २४ तासांत ५७ हजार ७४ कोरोनाबाधित रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा उच्चांक; २४ तासांत ५७ हजार ७४ कोरोनाबाधित रुग्ण

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. मागील २४ तासांत राज्यात ५७ हजार ७४ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८६ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज रोजी राज्यात एकूण ४ लाक ३० हजार ५०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, मागील २४ तासांत राज्यात २७ हजार ५०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख २२ हजार ८२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८३.८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ०५ लाख ४० हजार १११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३० लाख १० हजार ५९७ (१४.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ०५ हजार ८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९ हजार ७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.