मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आज(ता. १३) दिवसभरात राज्यात ८८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ६०२ नवीन कोरोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.
राज्यात आज 15602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2125211 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 118525 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 13, 2021
याशिवाय आज ७ हजार ४६७ रुग्ण कोरोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१ लाख २५ हजार २११ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.४९ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,९७,७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर ५ हजार ३१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१८,५२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.