हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली…
क्रीडा

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली…

दुबई : भारताचा आज आशिया चषकातील सामना हाँगकाँगबरोबर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आता भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतापुढे हाँगकाँगचे आव्हान हे फार मोठे नसल्याचे, बऱ्याच चाहत्यांना वाटत आहे. कारण हाँगकाँगचा संघ भारतापुढे फारच नवखा आहे. पण हाँगकाँगने धक्का देण्यापूर्वीच भारतीय संघात चिंतेचा वातावरण पसरले आहे. हा सामना भारतासाठी महत्वाचा आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघ सुपर-४ फेरीतील आपले स्थआन निश्चित करणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं घडलं तरी काय, पाहा….
भारताने आशिया चषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तावर पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता. पण या सामन्यात जे काही घडले त्याचा फटका भारतीय संघाला आता बसला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून एक मोठी चूक झाली होती. या चुकीचा फटका आता भारतीय संघाला बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची प्रथम गोलंदाजी होती. त्यावेळी रोहित शर्माला निर्धारीत वेळेत भारताची २० षटके पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे भारतीय संघाला अखेरच्या दोन षटकांमध्ये पाच खेळाडू ३० यार्डाच्या आतमध्ये ठेवावे लागले होते. त्यावेळी या गोष्टीचा फायदा पाकिस्तानच्या संघाने घेतला होता. पण आता आयसीसीने याबाबत कडक पाऊल उचलले आहे. या सामन्ययात भारतीय संघाला संथ गोलंदाजीमुळे निर्धारीत वेळेत २० षटके पूर्ण करता आली नव्हती. दोन षटके निर्धारीत वेळेनंतर टाकली गेली होती. यामुळे भारतीय संघाला आता दंड भरावा लागणार आहे. एक षटक उशिरा टाकले की, २० टक्के मानधनात कपात केली जाते. पण भारताने दोन षटके उशिरा टाकली, त्यामुळे आता त्यांना मानधनातील ४० टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. ही गोष्ट फक्त इथपर्यंत थांबत नाही, तर यापुढे जर रोहित शर्माकडून अशाच चुका होत राहिल्या तर त्याला एका सामन्यासाठी संघाबाहेरही जावे लागू शकते. त्यामुळे रोहित शर्माची चिंता आता वाढेलली असेल. त्याचबरोबर भारतीय संघासाठीही हा एक धक्का असेल. त्यामुळे आता पुढच्या सामन्यांमध्ये भारताला निर्धारीत वेळेत आपली षटके पूर्ण करावी लागणार आहेत.

या सामन्यात पाकिस्तानच्या संघाकडूनही भारतासारखीच चूक घडली होती. त्यांनीही दोन षटके उशिरा टाकली होती. त्यामुळे आयसीसीने त्यांच्यावरही अशीच कारवाई केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या मानधनातूनही ४० टक्के रक्कम ही दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे.