भारत-वेस्ट इंडिजचे T 20 सामने ३ ऑगस्टपासून सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
क्रीडा

भारत-वेस्ट इंडिजचे T 20 सामने ३ ऑगस्टपासून सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला ३ ऑगस्ट म्हणजे गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन टी-२० सामने हे अमेरिकेत खेळवण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना हा ३ ऑगस्टला त्रिनिदादमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ हो प्रोव्हिडन्स येथे जातील. यावेळी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल दसरा टी-२० सामना हा ६ ऑगस्टला रंगणार आहे.भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-२० सामना हा ८ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. हा सामनादेखील प्रोव्हिडन्सच्या मैदानात रंगणार आहे. या तीन टी-२० सामन्यांनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ अमेरिकेत जाणार आहेत. भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-२० सामना हा १२ ऑगस्ट या दिवशी रंगणार आहे. पण त्यानंतर होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यासाठी एका दिवसाची विश्रांती नसणार आहे. कारण हा पाचवा टी-२० सामना हा लगेचच १३ ऑगस्ट या दिवशी खेळवण्यात येणार आहे.

भारताचा टी-२० संघ: इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज टी-२० संघ : रोवमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाइ होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारिओ शेफर्ड, ओडीन स्मिथ, ओशने थॉमस.

सलामीवीर ईशान किशन, शुभमन गिल, संजू सॅमसन आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने वन-डे क्रिकेट मालिकेत यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध ३५१ धावा केल्या. ही वन-डेत विंडीजविरुद्ध वेस्ट इंडिजमधील भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. वेस्ट इंडिजमध्ये भारताची वेस्ट इंडिजविरुद्धची ही वन-डेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी, २००९मध्ये भारताने किंग्जस्टनला विंडीजविरुद्ध ६ बाद ३३९ धावा केल्या होत्या. ही यापूर्वीची वेस्ट इंडिजमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या होती. वन-डे क्रिकेटमध्ये भारताने चौथ्यांदा विंडीजविरुद्ध साडेतीनशेहून अधिक धावा केल्या. यापूर्वी, भारताने विंडीजविरुद्ध इंदूरला २०११मध्ये ५ बाद ४१८, विशाखापट्टणमला २०१९मध्ये ५ बाद ३८७, तर ब्रेबर्नला २०१८मध्ये ५ बाद २७७ धावा केल्या होत्या.