मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनामुक्तांचा आकडा हा १८ लाखांच्या पार गेला असून आत्तापर्यंत एकूण १८ लाख २८ हजार ५४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात ३ हजार ५०९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर मागील २४ तासांमध्ये ५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २७ लाख ४७ हजार ६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३२ हजार ११२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील मृत्यूदर हा सध्या २.५६ टक्के इतका आहे. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ३०३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
राज्यात आज 3509 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3612 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1828546 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52902 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.64% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 31, 2020
राज्यात आता एकूण ५२ हजार ९०२ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यात ३ हजार ५०९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ३ हजार ६१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ३२ हजार ११२ इतकी झाली आहे.