मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात करण्यात आला आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा ९९.६३ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्यव एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ टक्के आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
#HSCResult 2021: A quick step-by-step guide on how to view the result.#HSCResult 2021: निकाल पाहण्यासाठी खालील सूचनांप्रमाणे पुढे जा.#HSC #hscresults #resultsday @msbshse @scertmaha pic.twitter.com/Gto6VWuHKZ
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 3, 2021
कोकण विभागाचा निकाल हा ९९.८१ टक्के लागला आहे. हा निकाल इतर विभागापेक्षा सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा ९९.३४ टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थीनींचा निकाल ९९.७३ टक्के लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल हा ९९.५४ टक्के लागला आहे. विद्यार्थींनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.१९ टक्क्यांनी अधिक आहे.
या संकेतस्थळांवर पाहा तुमचा निकाल