ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी; किलोला मोजावे लागतात लाख रुपये
शेती

ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी; किलोला मोजावे लागतात लाख रुपये

औरंगाबाद (बिहार) : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने हॉप शूट्स नावाच्या भाजीची लागवड केली असून या भाजीची किंमत एक लाख रुपये प्रतिकिलो असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमधील नवीननगर ब्लॉकमधील करमडीह गावातील ३८ वर्षीय शेतकरी अमरेश सिंह हे या भाजीचं उत्पादन घेणारे पहिले भारतीय शेतकरी ठरले आहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये एका किलो हॉप शूट्स एक हजार पौंडांना विकले होते. भारतीय चलनानुसार ही किंमत किलोमागे एक लाख रुपये इतकी होते. अर्थात ही भाजी इतकी महाग असल्याने ती भारतात खूपच कमी मिळते. खरं तर विशेष मागणी केल्यानंतर ती उपलब्ध करुन दिली जाते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमरेश सिंह यांनी यासंदर्भात द न्यू इंडियन एक्सप्रेशशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॉप शूट्सच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासंर्भात काही निर्णय घेतले तर या वनस्पतीच्या शेतीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याची कमाई आतापेक्षा किमान दहा पटींनी वाढवता येईल. सध्या ऑप शूट्सची शेतकी वाराणसीमधील भारतीय भाजी अनुसंशाधन संस्थेमधील कृषी संशोधक असणाऱ्या डॉ. लाल यांच्या देखरेखीखाली केली जात आहे. आयएएस अधिकारी असणाऱ्या सुप्रिया साहू यांनी अमरेश यांच्या या प्रायोगिक शेतीसंदर्भातील ट्विट केलं असून एक किलो भाजीची किंमत एक लाख रुपये इतकी आहे. ही जगातील सर्वात महागडी भाजी आहे. बिहारमधील अमरेश सिंह हे भारतामध्ये या भाजीचं उत्पादन घेणारे पहिले शेतकरी आहेत. भारतीय शेतकऱ्यांसाठी ही भाजी गेम चेंजर ठरु शकते, असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.

काय आहे भाजीचा इतिहास?
या भाजीचं उत्पादन ११ व्या शतकामध्ये करण्यात आलं आहे. ही वनस्पती त्यावेळी बियरमध्ये फ्लेवर आणण्यासाठी वापरली जायची. नंतर या वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून आणि आता थेट भाजी म्हणून करण्यात येऊ लागला आहे.

का आहे एवढी महाग?
शूट्सला एवढी किंमत असण्यामागील कारण म्हणजे या वनस्पतीमध्ये दोन खास प्रकारची अ‍ॅसिड मिळतात. या अ‍ॅसिडची नावं आहे ह्यूमोलोन्स आणि ल्यूपोलोन्स. या अ‍ॅसिडच्या मदतीने मानवी शरीरामध्ये अनियंत्रित पद्धतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींवर उपचार करता येतो असं मानलं जातं. कॅन्सरसारख्या आजारावर मात मिळवण्यासाठी या वनस्पतीमधील अ‍ॅसिड उपयोगी असल्यानेच तिला एवढा भाव मिळतो.