महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

नागपूर : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली असून हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नागपुरच्या पाचपावली या भागातील ही घटना आहे. नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे.

रविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आज (ता. २१) सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.