मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून मृतांचा आकडा वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण वाढलेलं असताना आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये देखील मोठी वाढ दिसू लागली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आज (ता. ३१) बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल २२७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या दैनंदीन अहवालानुसार या मृतांसोबत राज्याचा मृत्यूदर १.९४ टक्के इतका झाला आहे. त्याचसोबत दुसरीकडे ३९ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.
राज्यात आज 39544 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2400727 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 356243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 31, 2021
काल (ता. ३१) दिवसभरात २३ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले असले, तरी राज्याचा एकूण रिकव्हरी रेट ८५.३४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे हळूहळू राज्य सरकारची चिंता आणि कोरोनाचा पुन्हा वाढता फैलाव रोखण्याचं आव्हान अशा दोन्ही गोष्टी अधिकाधिक तीव्र होऊ लागल्या आहेत.