नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा दिला असून सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. सायरस मिस्त्रींसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.२६) महत्वाचा निर्णय दिला.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाने टाटा समूहातील शंभराहून अधिक कंपन्या सांभाळणाऱ्या टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांच्या हकालपट्टीचा निर्णय बेकायदेशीर ठरवला होता. टाटा सन्सने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. १० जानेवारीला न्यायालयाने सायरस मिस्री यांच्या पुनर्नियुक्तीला स्थगिती देत निर्णय राखून ठेवला होता.
सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपाठीने दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयासंबंधी केलेल्या युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय टाटा सन्ससाठी मोठा विजय आहे.
VERDICT ALERT: TATA vs CYRUS MISTRY
CJI SA Bobde led bench to shortly deliver judgment in the dispute between Tata Group’s holding company, Tata Sons Limited and Shapoorji Pallonji Groups’ Cyrus Mistry#SupremeCourt @TataCompanies @CyrusMistrySupt pic.twitter.com/CJA892dY3U
— Bar & Bench (@barandbench) March 26, 2021