मुंबई : देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून राज्यात आज आज ४६हजार ७८१ नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५ लाख ४८ हजार १२९ वर पोहोचली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
त्याचबरोबर राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर हा गेल्या काही दिवसांपासून १.४९ टक्क्यांवर स्थिरावला आहे.
राज्यात आज 46781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 58805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4600196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 546129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 12, 2021
आजही पुण्यातली रुग्णसंख्या ही राज्यात सर्वाधिक म्हणजे ४हजार ३६३ इतकी आहे. तर त्याखालोखाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १५२ नव्या बाधितांची नोंद झाली. तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे १० नव्या बाधितांची नोंद झाली.