मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून आज मृत्यूचा आकडा वाढला आहे. एकीकडे राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल ५६ हजार २८६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर ३७६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आज ३६ हजार १३० रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २६ लाख ४९ हजार ७५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.०५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५७ हजार २८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, आज रोजी राज्यात एकूण ५,२१,३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 56286 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 36130 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2649757 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 521317 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.05% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 8, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी १३ लाख ८५ हजार ५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२ लाक २९ हजार ५४७ (१५.१० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ०२ हजार ६१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२ हजार ६६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.