मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षाबाबतही मोठा निर्णय
देश बातमी

मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षाबाबतही मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला असून सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचंदेखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी सीबीएसईकडून करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.