राज्यात आज ८ हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; १७० रूग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आज ८ हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; १७० रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. राज्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त संख्येने करोनाबाधित आढळून आले आहेत. दिवसभरात राज्यात ८ हजार १० नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ७ हजार ३९१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, राज्यात आज १७० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ५२ हजार १९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.१७ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ४८ लाख २४ हजार २११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख ८९ हजार २५७ (१३.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८१ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख ०७ हजार २०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.