मुंबई : राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंभरठ्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४९ हजार ६३१ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात दिवसभरात ३ हजार २१८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २ हजार ११० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९४.६४ टक्के झालं आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यात सध्या ५३ हजार १३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करुन दिली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १८ लाख ३४ हजार ९३५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५३ हजार १३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 3218 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2110 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1834935 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53137 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.64% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 2, 2021