पोलिसांचा एक प्रश्न आणि आफताब अडकला, अखेर गुन्हा कबूल केला…
देश बातमी

पोलिसांचा एक प्रश्न आणि आफताब अडकला, अखेर गुन्हा कबूल केला…

नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी तिचा बॉयफ्रेंड आफताब अमिन पूनावाला याने अखेर आपला गुन्हा कबूल केला आहे. आफताबला अटक केल्यानंतर तापासादरम्यान त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या एका प्रश्नापुढे अखेर त्याला नमतं घ्यावं लागलं. अखेर आफताबला त्याचा गुन्हा कबूल करावा लागला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा आफताबने पोलिसांना सांगितले होते की, २२ मे रोजी भांडण झाल्यानंतर श्रद्धा घरातून निघून गेली होती (१८ मे रोजी श्रद्धाची हत्या झाली होती). त्याने सांगितले की तिने फक्त तिचा फोन तिच्याजवळ ठेवला होता आणि तिचे सामान त्याच्या फ्लॅटवर सोडले होते. मात्र, पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि त्यांचे लोकेशन ट्रेस केले तेव्हा सत्य समोर आले.

असा सापडला पोलिसांच्या कचाट्यात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबचं पितळ उघडं पडलं, त्याने आधी सांगितले होते की २२ मे नंतर श्रद्धा संपर्कात नाही. २६ मे रोजी झालेल्या बँक ट्रान्सफरचे ठिकाणही मेहरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासात सहभागी असलेले पोलीस अधिकारी सचिन सानप यांनी आफताबला विचारले की, त्यानंतर तू तिला पुन्हा कधी भेटलास? तर आफताबने उत्तर दिले की श्रद्धा १२ जून रोजी तिचे कपडे घेण्यासाठी परत आली होती. तेव्हा अधिकाऱ्याने विचारले की श्रद्धाने तिचा फोन नेला होता का?

सचिन सानप यांनी आफताबला सांगितले की, श्रद्धाचं फोन लोकेशन २६ मे पर्यंत तुझ्या छत्तरपूर येथील घरी दिसत आहे. मग तिने फोन घेतला होता तर तिचे लोकेशन घरचं का दाखवत आहे आणि जर तिने मोबाईल घरीच ठेवला तर तो कधीच घरातून बाहेर निघाला नाही? त्यानंतर सचिन सानप त्याला म्हणाले, मित्रा तू आता फसला आहेस, तुझा गुन्हा मान्य कर नाहीतर आता तू मरशील.

अशी सुरु झाली लव्ह स्टोरी

आफताब आणि श्रद्धा सुरुवातीला जेव्हा रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हा श्रद्धा मालाडमधील डेकॅथलॉनच्या कॉल सेंटरमध्ये काम करायची. काही काळानंतर आफताबनेही हेच कॉल सेंटरला जॉईन केलं आणि तिथे काम करायला सुरुवात केली. काही काळ काम केल्यानंतर आफताबने तिथली नोकरी सोडली आणि श्रद्धा तिथेच काम करत होती. हे सर्व लॉकडाऊनपूर्वीचं होते. त्यानंतर श्रद्धा आणि आफताब अनेक वर्षे एकत्र राहिले आणि दोघांमध्ये भांडणं होत राहिली. त्यानंतर मे महिन्यात आफताबने श्रद्धाची निर्घृण हत्या केली आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते जंगलात फेकले.