राजीव गांधी यांनी रोवली तरुण भारताची मूहूर्तमेढ – आ. संजय जगताप
राजकारण

राजीव गांधी यांनी रोवली तरुण भारताची मूहूर्तमेढ – आ. संजय जगताप

पुणे : तरुण भारताची मूहूर्तमेढ राजीव गांधी यांनी रोवली असल्याचे मत पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त पुणे शहर व जिल्हा काँग्रेस आणि राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने कात्रज सर्पोद्यान येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजीव गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, गेल्या वर्षभरात टाळेबंदीसारखी परिस्थिती उद्भवली. या काळात राजीव गांधी यांनी आणलेले तंत्रज्ञान देशाला तारुन नेत असल्याचे दिसून येत असून त्यांच्या संगणक क्रांतीमुळे आपल्याला अनेक गोष्टी सुलभ झाल्या. पंतप्रधान मोदींनी आत्मपरिक्षण म्हणून राजीवजींच्या कार्यकाळाची आपल्या कार्यकाळासोबत तुलना करून पाहायला हवी, असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले. राजीव गांधी यांचे नाव जगामध्ये अजरामर असल्याचे मत यावेळी भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.

यावेळी आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, राजीव गांधी स्मारक समिती संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, किशोर रायकर, रमेश सोनकांबळे, संग्राम मोहोळ, महेश बापू ढमढेरे, सुर्यकांत मारणे, लक्ष्मण आबा तरवडे, पृथ्वीराज पाटील, अविनाश गोडबोले, आबा जगताप, संजय अभंग, सेवादल प्रमूख हरिदास अडसूळ, घनःश्याम निम्हण, महेश अंबिके, नर्सिंह अंदोली उपस्थित होते.