अखेर पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात खेळण्याला हिरवा कंदील
क्रीडा

अखेर पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात खेळण्याला हिरवा कंदील

नवी दिल्ली : ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्डकपसाठी पाकिस्तानला भारतात खेळण्यास परवानगी मिळाली आहे. त्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळणार आहे. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा टी-20 वर्ल्ड कप भारतात नऊ ठिकाणी होईल आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगेल, अशी माहितीही देण्यात आली आहे. काल (ता. १६) शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या शिखर परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगलुरू, हैद्राबाद, धर्मशाला आणि लखनऊ या ठिकाणी आगामी वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. परिषदेच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट संघाचा व्हिसाचा प्रश्न सुटला असून चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी दिली जाणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा निर्णय त्यावेळची परिस्थिती पाहून ठरविण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे भारत आणि पाकिस्तान जवळजवळ दशकभर आपापसात द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळलेले नाहीत. 2016मधील टी-20 वर्ल्डकप भारतात खेळला गेला, त्यादरम्यान बीसीसीआयने 7 ठिकाणी स्पर्धेचे सामने खेळवले होते. नागपूर आणि मोहाली येथेही सामने घेण्यात आले होते, परंतु यावेळी या दोन स्थानांऐवजी हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.